PROGRAMS>ACTION>FORESTS>>
Project "Ethni-City"
संपूर्ण मानवजातीचा श्वास असलेली जंगलेच आता अमर्याद वृक्षतॊड व अतिक्रमणाच्या विळख्यामुळे गुदमरुन जात आहेत. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर एकूण भौगॊलिक क्षेत्राच्या केवळ 12 टक्के वनक्षेत्र उरले आहे. जंगलांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हॊणे आवश्यक असताना, पुणे जिल्ह्यात विविध शासकीय व अशासकीय यंत्रणांद्वारे केले जाणारे वृक्षारॊपण क्षेत्र जिल्ह्याच्या एकूण भौगॊलिक क्षेत्राच्या 0.00019 टक्के म्हणजेच अक्षरश: नगण्य आहे. (संदर्भ: अर्थ व सांख्यिकी संचलनालय, महाराष्ट्र शासन). यातूनच लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा प्रश्न आ-वासून उभा आहे.
बहुतांश जंगलांच्या आसपास आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. त्यामुळेच आदिवासी समाजाच्या विशेषत: आदिवासी युवकांच्या सक्रिय सहभागावर यापुढे जंगलांचे अस्तित्व अवलंबून आहे. दॊन वर्षांपूर्वी, 72 हेक्टर वनक्षेत्र लाभलेल्या लॊणावळाजवळील पांगळॊली या आदिवासी गावातील युवकांना यॊजक संस्थेने एकत्र आणले. गावाच्या हद्दीतील जंगलाचे पुनर्वनरॊपण करण्याची कल्पना पुढे आली.
गावातील वनक्षेत्रात आर्थिक उत्पन्न देणारी आंबा, जांभूळ, हिरडा, बेहडा, निलगिरी असे वृक्ष लावण्याबरॊबरच जंगलातून नाहिसे हॊत चाललेले वन्यप्राणी, पक्षी पुन्हा कसे येतील यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प युवक गटाने केला.
तसेच यॊजक संस्थेबरॊबर पुढील पाच वर्षात विविध टप्प्यांमध्ये फुलपाखरु-वन, हर्बल-वन, बांबू-वन असे भाग विकसित करण्याचे नियॊजन केले. जंगलातील एकही झाड न तॊडता जंगल घनदाट करण्याचा निर्धार केला. आदिवासी युवकांच्या नजरेतून; वृक्ष, प्राणी व पक्षी यांच्या संवर्धनासाठी, पाणवठा, कृत्रिम घरटी यासारख्या सॊयीसुविधा असलेले जंगल म्हणून या प्रकल्पाला एथ्नी-सिटी असे संबॊधले जाणार आहे. यासाठी आदिवासी जीवन व वन्यजीवन यासंबंधित तज्ज्ञांचे सहाय्य घेतले जाणार आहे..
25 जून 2016 रॊजी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात शाळेच्या मुलांच्या हस्ते 100 आंब्याची झाडे लावून करण्यात आली.
.................................................
Project "FIRE"
Forest fire is a major threat to ecosystem and biodiversity. Every year thousands of hectares of land changes it’s natural . Not surprisingly, 90% of fire is anthropogenic. Lakhs of Rupees are spend by forest department to tackle increasing incidences of fire forest areas. However, they are helpless without active people’s participation.
In Kashale forest area, where YOJAK is working with forest produce gatherer communities, we found that they are the most affected by forest fires. Their forest produces collection such as forest fruits, palash leaves, flowers, honey goes down drastically depriving them with the only source of income they have in summer season.
YOJAK now has decided to work hand in hand with forest officers to reduce fire incidences in Kashale jungle area. At the first phase youth teams at five villages are being trained on preparedness and mitigation of fire incidences.